|| श्री ||
आमच अस्तित्व कुठेतरी नाहीस झालय...
मी एक कागदाचा तुकडा , माझा जन्म तसा खूप पूर्वी झालाय , आधी मी कुठल्या तरी पानाचा होतो , जग जस बदलत गेले तसा मी हि बदलत गेलो , पूर्वी मला पोह्चवण्यासाठी खास एक माणूस आसायचा , पूर्वी मला बोरू णे लिहायचे नंतर नंतर त्यातही बदल होत गेला , माझ्या वर काय काय लिहील , अजरामर ग्रंथ,अजरामर काव्य, मला तर तुम्ही माणसांनी एक ऐतिहासिक ठेवा म्हणून जपून हि ठेवलय , पण माझ्यातले अनेक प्रकार काळानुसार बदलत गेले आणि बंद होत गेले , त्यातलाच पत्र हा व्यवहार आता पूर्ण पणे बंद होत चाललेला आहे . हल्ली पत्र फक्त जातात ती शाळेतून शिक्षकांनी त्यांच्या पाल्यांच्या पालकांना लिहिलेली . असो
पूर्वी कस माझी एक वट असायची या घरातून त्या घरात मी दीमघात जायचो , कुठून कुठून मी यायचो , मला तुमच्या कडे सुपूर्त करणारा हि प्रेमळ आसायाचा एका विशिष्ट पोशाखात आसायाचा. तो रोज सकाळी एक सबनम खांद्यावर लटकवत एक रुबाबदार असलेला माझा तो साथी नाहीसा झालाय . मी त्या लाल पेटीत असायचो आणि मला त्या लाल पेटीतून काढल जायचं ... ते माझ घर ती पेटी हि इतिहास जमा झालेली आहे . हल्ली आमची ओळख एका पुस्तकाद्वारे हल्लीच्या पिढीला होते . ट - टपाल , प - पत्र अशीच काय ती आमची ओळख ...
मी माझ अस्तित्व हरवलेलं एक पत्र बोलतोय ...
मोबाईल वर आपण रोजच टाईप करत असतोच पण एकदा माझ्या अस्तित्वासाठी स्वता:च्या जवळच्या माणसाला पत्र ;इहून लिहते व्हा ...
तुम्हाला पूर्वी पटलेला आणि आता तुमच्यातून नाहीसा होत चालेला एक कागद ज्याला तुम्ही पत्र , म्हणता ...
फोटोग्राफ - पद्मनाभ खोपकर -दिवेआगर
लेखन - श्रेयश रघुनंदन रोडे .
तळा -रायगड
मोबाईल नंबर - ८६००२३४६६३