।। श्री ।।
काकस्पर्श शेवटी झाला नाहीच...
एकजण अगदी कोकलून ओरडला , त्याला भूक लागली असावी बहुतेक पण तो तसा स्पष्ट बोलत नव्हता , नंतर नीट पाहिल्यावर लक्षात आलं कि हा आपलाच सवंगडी , एक पान गळून पडल्यावर बाकीच्या पानांच्या मनाची तयारी होते कि आता आपण हि असेच गळून पडणार तसच त्याच हि झालं असावं बहुदा असो. मी काय तिथून जायला तयार नव्हतो आणि कावळ्याने हि ठरवलं होत कि आपण शिवायचं म्हणजे शिवायचं , पण तस प्रत्यक्षात होत नव्हतं .

काळ बदलत जात होता , खऱ्या आयुष्या मधला जिवलग आज पित्र झाला होता ...
पोराने तस सर्व ताट सायसंगीत भरून ठेवलं होत , आणि टेरेस वर सर्व सजवून ठेवलं होत , जिवंत असताना आपल्या बापाला काय आवडत हे माहित असून कधी कोण देत नाही , आणि आता वर ढगात गेल्यावर जावई पहिल्यांदा सासुरवाडीला गेल्यावर जस आदर तिथ्य होत अगदी तस करतात , आणि आज तरं जरा जास्तच ताट भरून ठेवलं होत ,
-शेवटी सुनबाई काहीतरी पुटपुटली त्याच्या कानात आणि तो मनातल्या मनात पुटपुटला,
-बाबा मला माफ करा ,मी तेव्हा तस करायला नको होत , मी माझी पातळी सोडली ,
पण मला त्याची द्या आली नाही , मला त्या खोळंबलेल्या माणसांची दया आली , जे थांबले होते हल्ली कोण एवढं कुणासाठी थांबतय , पण ते थांबले , असो