Sunday, 17 May 2020

इंडिया आणि भारत ...

                                                                          ।।श्री।।

                                                                   इंडिया आणि भारत ... 
         
           किती दूर जावे , कुठे थांबावे , काय करावे , सुचत नाही,  असच आजच्या  मजुराचं झालाय , कितीही चालला तरी रस्ता संपत नाही .तो वाढत  चाललाय . कधी कधी मला अभिमान वाटतो कि, माझाच  देश आहे , त्याला दोन नाव आहेत , एक भारत आणि दुसरं इंडिया ...
    नाण्याला जशा दोन बाजू असतात ना , तशाच या दोन बाजू आहेत , भारत म्हणजे माझा सुजलाम सुफलाम  असा , आणि इंडियन म्हणजे , माझ्या भारतामधला कुणीतरी एक दुसऱ्या देशात जाऊन त्याची प्रगती करतो तो  म्हणजेच इंडियन ...
      दोन्ही हि खूप चांगलं काम करणारे , एक भारतीय हरित क्रांतीचा जनक तर Nuclear Test करणारा  ... एक इंडियन .
          दोन्ही आपल्या देशाचा फायदा करणारे , देशसेवा करणारे .

डिसेंबर २०१९ ( कोविड -१९) याने जन्म घेतला , सुरुवातीला काहीच वाटलं नाही , पण नंतर ह्याने भस्म्या झाला सारखं सर्व गिळंकृत केलं ,
  बाहेरच्या इंडियन ना आता माझ्या भारताची आठवण येऊ लागली , ते विमानाने आले , माझ्या देशात पण माझा भारतीय हा पायी चालत जाऊ लागला . माझ्या महारष्ट्रातून इतर राज्यात जाणारे मजूर खूप होते , पण एक इंडियन म्हणून बाहरेच्या देशात गेलेले भारतीय हे त्याहून आधिक होते ...

आजची परिस्थिती ... एक बोलकं चित्र ... खूप सांगून जातेय ....
चित्र - सिद्धेश अंनत कदम ... 
                 त्यात हा रोग , महामारी सपूंर्ण विश्वात पसरली ,  एका युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाले . प्रत्येक इंडियन आपल्या भारतात येणे त्याला आणणे हे आपलं कर्तव्य नव्हे तर आपली जबाबदारी आहे .
आपल्या इंडियन हा बाहेरगावी  आहे , त्याना आणण्यासाठी विनामूल्य मदत केली जाते , आणि दुसरीकडे भारतीय  श्रमिक गरिब बांधवाना गावी नेण्यासाठी राज्य सरकार केंद्रसरकार कडे १५% ने वाद घालते. 
            आता सोडल्यात  गाडया प्रत्येक राज्यात  पण खूप उशीर झाला ....
      नुकतीच काही दिवसापूर्वी औरंगाबाद मध्ये घडलेली  घटना अगदी ताज उदाहरण , या घटनेमध्ये आपापला फायदा पाहून काही जण आपलं मत व्य्क्त करत बसले . तर काही जण त्या मजुरांना दोष देत बसले .
 जर का त्या मजुरांना , मदत केली असती , जर का आश्रय दिला असता या, समाजसेवी संस्थानी  त्याच्या परीने काही केलं असत तर कदाचित हि दुर्घटना घडली नसती ....
शेवटी जर तर चा विषय ...

पण आज मी किंवा तुम्ही हे वाचत असताना हजारो मजूर कुठल्या ना कुठल्या मार्गाने जात असतील तो मार्ग आपलंही असू शकतो तर त्याना आराम करण्यासाठी जागा द्या ...
 विचार करण्याची बाब म्हणजे परदेशांत कुठेतरी हा व्हायरस तयार होतो ... विमानाने तो भारतात येतो आणि या सगळ्यचा परिणाम भोगतोय कोण ..... तर एक भारतीय आणि भारतातून बाहेर गेलेला एक इंडियन ....

त्याचा परिणाम होतोय कुणावर यर एका भारतीयांवर  .... आणि एका बाहेरगावरून आलेल्या इंडियन वर ....



चित्र - सिद्धेश अनंत कदम .
विशेष सहकार्य - कुणाल काळे
 लॆखन - श्रेयश रघुनंदन रोडे ....
  तळा -रायगड  मो - ८६००२३४६६३







दिनांक - १७-०५-२०२०





16 comments:

  1. Ek no siddya bhai ani Shreyas bhai

    ReplyDelete
  2. Nice shreyas keep on going superb written your thoughts and nice cartooning siddhesh

    ReplyDelete
  3. Nice article & cartooning, you are doing very well

    ReplyDelete
  4. very nice 👌keep writing such a great stories👍

    ReplyDelete
  5. Very nicely described current situation..

    ReplyDelete
  6. आजच्या परिस्थितीचे अचूक वर्णन.

    ReplyDelete
  7. Shreyas mastch keep it up
    Sanklpna aavdli

    ReplyDelete
  8. Khup Chan
    शब्दांचे गुंफण अप्रतिम

    ReplyDelete
  9. Nice cartoon and good articl keep it up gyss

    ReplyDelete
  10. Very nice shreyash....i wish to god that u become a good writer....👍 well done ....keep it up....

    ReplyDelete

काकस्पर्श शेवटी झाला नाहीच...

।। श्री ।।  काकस्पर्श शेवटी झाला नाहीच...            कावळा काव काव करत वरून नुसत्या घिरट्या घालत होता , कावळा सोबत लेक पण काव काव करत होता ,...